सातारा -शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर सातारा जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी खटाव तालुक्याचे दमदार नेते शेखर गोरे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी बढती देण्यात आली आहे. याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेतल्या फुटी नंतर ठाकरे गटाला गळती लागली आणि शिवसेनेचे 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही शिंदे गटांमध्ये इन्कमिंग सुरूच आहे त्याचाच परिणाम सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर पाहायला मिळत आहे . मागील अनेक वर्षापासून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी होती मात्र या काळामध्ये शिवसेनेला अनेक राजकीय धक्के पाचवावे लागले मात्र त्या काळात पक्षाची दमदार कामगिरी होऊ शकली नाही उलट शिवसेनेमध्ये फाटा फूट होऊन उद्धव ठाकरे यांना संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करावी लागली.
त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदी खटाव तालुक्याचे दमदार नेते शेखर गोरे यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड केली आहे . गोरे यांचे खटाव तालुक्यात मोठे संघटन आहे माण खटाव तालुक्यात आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे ते ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर विशेषतः खटाव तालुक्यात शेखर गोरे यांची राजकीय पकड मोठी आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतही त्यांनी आपली राजकीय चुणूक दाखवली होती.शिवसेना संघटन वाढवण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी शेखर गोरे यांची निवड केल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे वाढते राजकीय आक्रमण रोखण्यासाठी गोरे यांच्या हातात हा पदभार देण्यात आल्याची चर्चा आहे त्यामुळे शिवसेनेला सातारा जिल्ह्यात किती राजकीय बळ मिळणार याचे उत्तर आगामी भविष्यात पाहायला मिळणार आहे मात्र नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राच्या संघटनात्मक बांधणीची जवाबदारी देण्यात आली आहे.