मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नेमण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे केंद्र सरकारच्या या निर्णयाची तिखट शब्दांमध्ये आलोचना केली आहे.
धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थाबाहेरील सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याच्या निर्णय केंद्र सरकारने संकुचित, कोत्या मनाने घेतल्याचा आरोप केला. आपल्या ट्विटर खात्यावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी, ‘केंद्र सरकारने शरद पवार यांच्याविरोधात प्रथम ईडी चौकशी बसवली, नंतर पक्षाचे आमदार फोडले आणि आता सुरक्षा व्यवस्था काढली’ असा आरोप त्यांनी केला.
ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती नीच पातळी गाठणार? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध!https://t.co/KslKO0hi4M
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 24, 2020