नवी दिल्ली – दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्कीस दादी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळाकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने त्या आंदोलनात सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यांची नंतर सुटका करण्यात आली.
पोलिसांनी बिल्किस दादी यांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
दिल्ली, हरियाणा सीमेवरील सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा बिल्कीस यांनी व्यक्त केली. मात्र त्यांना दिल्ली पोलिसांनी रोखले. या भागात शेतकऱ्यांची तीव्र निदर्शने सुरू आहेत.