नवी दिल्ली- नांदेड शहरामधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले.
माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही प्रताप यांनी अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात दिले अमित शाह यांनी निवेदन स्वीकारुन या प्रकरणासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
संजय बियाणी यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात घेतलेली भरारी अतुलनीय होती. सामाजिक क्षेत्रातले त्यांचे काम तितकेच मोठे होते. माहेश्वरी समाजातील गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवत अल्पदरामध्ये घरे दिली होती. त्यामुळे संजय बियाणी यांचे सामाजिक आणि बांधकाम या क्षेत्रातील योगदान समाजहिताचे होते. मात्र पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात मारेकऱ्यांनी बियाणी यांच्या घरासमोर त्यांना गोळ्या झाडून हात्या केली.
याचवेळी चिखलीकर महेश्वरी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे आता संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून झाल्यास निश्चितपणे तातडीने धागेदोरे हाती लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.