मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या चित्रपटांबाबत नेहमीचं परिपूर्णतेने काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबत तो आपल्या कुटुंबाला देखील जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. शाहरुखची पत्नी गौरी खान देखील शाहरुखला नेहमीच मदत करत असते. दोघांचं एक वेगळं बॉण्डिंग ऑफस्क्रिन पाहायला मिळत. दोघांची लव्हस्टोरी देखील खूपच रंजक आहे. त्यांच्या सुरुवातीच्या काळात शाहरुखने गौरीसाठी स्वतःच नाव देखील बदललं होत.
शाहरुख खानने गौरीसाठी आपले नाव बदलून ‘जितेंद्र कुमार तुली’ असे ठेवले होते. हा मजेशीर किस्सा ऐकून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही.शाहरुख खानच्या जीवनावर आधारित ‘शाहरुख कॅन’ या मुस्ताक शेखच्या पुस्तकात शाहरुख खानने आपले नाव बदलून जितेंद्र कुमार ठेवल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. कारण होते गौरीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न.
केवळ आणि केवळ गौरी सोबत विवाह करण्यासाठी शाहरुखने जितेंद्र कुमार हे नाव ठेवलं होत. हेच नाव निवडण्यामागे देखील एक करणं आहे ते देखील पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.शाहरुखच्या आजीला तो हिम्मतवालाच्या जितेंद्र प्रमाणे वाटत असल्यामुळे त्याने पहिले हे नाव निवडले. तर टुल्ली हे अभिनेते राजेंद्र कुमार यांचं खर आडनाव होत म्हणून शाहरुखने ते ठेवलं. मुळात जितेंद्र कुमार टुल्ली हे नाव निवडणूक शाहरुखने दोन दिग्गज सुपरस्टार्सना मानवंदना दिली.
केवळ शाहरुखनेच नाव बदलले नाही तर गौरी खाननेही निकाहसाठी आपलं नाव बदलले. या पुस्तकानुसार तिने निकाह दरम्यान आयशा हे नाव ठेवलं होत. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर, शाहरुख खान आणि गौरी यांनी ऑक्टोबर 1991 मध्ये लग्न केले आणि तेव्हापासून ते आनंदाने जगत आहेत. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत.