अकलूज : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे 24 हजार भाकरी व 125 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी दीपकराव खराडे पाटील संस्थेचे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील प्रमुख उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 24 जून रोजी अकलूज (जि. सोलापूर) येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि. पुणे) येथे असतो.
सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन कि. मी. असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. त्यांना घरगुती अन्नदान व्हावे या हेतूने सन 2015 पासून शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. अन्नदान वाटपाचे हे 9 वे वर्ष आहे.