भुवनेश्वर – महानदीच्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने ओडिशा राज्यात गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. तशातच मुंदाली मधून 7 लाख क्युसेक दराने पाणी सोडले जात असल्याने दया आणि भार्गवी नदीलाहीं पुर आला आहे. त्यातून या नद्यांच्या काठावर असलेली अनेक गावे जलमय झाली आहेत.
पुरी जिल्ह्यातील कन्सा आणि देलांग ब्लॉक मधील अनेक खेडी जलमय झाल्याची माहिती पुनर्वसन आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितली. कटक जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
महानदी ही ओडिशातील सर्वात मोठी नदी आहे. तिच्या पुरात ओडिशाबरोबरच शेजारच्या छत्तीसगड मध्येही पुरस्थिती निर्माण झाली आहे. हिराकुड धरणाचे 64 पैकी 46 दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे अनेक िंठकाणी अधिकच गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.