मुंबई – भारतीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू कोण, असे जर मला विचारले गेले तर मी कपिलदेव याचेच नाव घेईन. त्याच्या इतकी प्रतिभा असलेला खेळाडू माझ्या पाहण्यात तरी अद्याप आलेला नाही, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी कपिलदेव यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
भारतीय क्रिकेटला सातत्याने सरस खेळाडू मिळाले आहेत. त्यांनी महान ही उंचीही गाठली आहे. मात्र, 1950 ते 2020 या काळाबाबत बोलायचे झाले तर कपिलचा पर्याय नाही. माझ्या मते, सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिलदेव. अन्य कोणत्याही खेळाडूंपेक्षा तो जास्त सरस आहे. कपिल असा खेळाडू होता जो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीनेही संघाचा विजयी करू शकायचा. आक्रमक फलंदाजी ही त्याच्या रक्तातच होती व त्याचे दाखले त्याने अनेकदा दिले आहेत. म्हणूनच त्याची बरोबरी करेल असा एकही क्रिकेटपटू मी पाहिला नाही, असेही गावसकर म्हणाले.