तळेगाव दाभाडे 7 मार्च: मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात कला आणि वाणिजय शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनीचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वैशालीताई दाभाडे (उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे) होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन करताना, शिक्षणांची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करा, तुमच्यातील जिद्दच तुमच्या ईच्छा पूर्ण करू शकतात असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डबलयू.मिसाळ यांनी विद्यार्थीनी अथक मेहनत घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन यशसवी होतील आणि महाविद्यालयाचे नाव नावलौकिक करतील असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.यादवेंद्रजी खळदे (मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव) होते.शिक्षण हे जीवन आहे, त्यामुळे शिक्षण हे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तृतीय वर्ष कला आणि वाणिजय शाखेच्या वर्गशिक्षकांनी तसेच विद्यार्थीनींनी मनोगते मांडली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्म आणि विद्यार्थीनींनी प्रचंड प्रतिसाद दिला.
– प्रियांका निवडुंग गे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
तळेगाव दाभाडे