पुणे: लग्नानंतर बऱ्याच मुलींचे शिक्षण बंद होते किंवा ते बंद करण्यात येते. त्यामुळे त्यांना आपल्या स्वप्नांना देखील पूर्णविराम द्यावा लागतो. पण योगीता सचिन कोकाटे याला अपवाद आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्यासोबत साधलेला संवाद…
(1) लग्नानंतर शिक्षण का घ्यावं वाटलं? –
लहानपणी शाळेत हुशार होते कविता करायचे, वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्याची त्यामुळे शिक्षणाची आवड होती पण तेरावीत असताना लग्न झाले जरी लग्न झालं असले तरी मनात शिकण्याची खूप इच्छा होती. माझी मुले शाळेत जात असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला जायचे त्यानिमित्ताने माझ्या मैत्रिणी झाल्या पण त्यांचे शिक्षण आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि आपले कमी आहे ही गोष्ट मनात नेहमी असायची, त्यामुळे मी घरच्यांची परवानगी घेऊन मी महाविद्यालयात तेरावीला 17 वर्षानंतर प्रवेश घेतला त्या अगोदर दिवाळी प्रदर्शन भरवले त्यातून अनुभव आला त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा तीव्र झाली.
(2) तुम्हाला शिक्षणाची प्रेरणा कुठून मिळाली आणि तुमचे आदर्श कोण आहेत
– रोजच्या संघर्षातून प्रेरणा भेटत गेली मैत्रिणी माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या सोबत राहून खूप शिकले आणि शिक्षणाच्या दिशेने पाऊले उचलली .
(3)तुम्ही संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आहात,तर तुम्ही कुटुंबातील कामे आणि शिक्षण याचे व्यवस्थापन कसे करता ?
– संयुक्त कुटुंब पध्दतीमध्ये कामा चा व्याप खूप असतो. मग अगदी स्वयंपाक घरापासून ते शेतापर्यंत सर्व कामे पदर खोचून करावी लागतात. आणि हे प्रत्येक महिलेला करावे लागतात, संयुक्त कुटुंब पद्धतीत असल्यामुळे कोणताही निर्णय पटकन घेणे कठीण असते,आणि स्वतःच्या निर्णयांवर सर्वजण सहमत होतीलच असे नाही,त्यामुळे समजून घेऊन निर्णय घ्यावे लागतात.
(4) तुम्ही अनेक गोष्टीना समोर जाऊन प्रवेश मिळवला,पण आता कुटूंबातील सदस्याच्या काय प्रतिक्रिया असतात?
– आता सर्वांनाचं विश्वास पटला आहे की ही करू शकते त्यामुळे आता सर्वजण सहकार्य करतात, आणि आता अधिक उत्स्फूर्तपणे कराया आवडते.
(5) तुम्हाला वर्गमित्र मैत्रिणी भेटले, उत्तम शिक्षक भेटले त्याबद्धल काय वाटते?
– माझे मित्र मैत्रीणी शिक्षक म्हणजे माझ्या आनंदाचा कप्पा आहेत. मी खूप भाग्यवान आहे मला असे गुरुजन आणि मित्र मैत्रिणी भेटले. आणि आताची मुले खूपच हुशार आहेत. ते समजून घेतात अभ्यासात मदत करतात पण मला वाटलेलं मुलं मला समजून घेतली की नाही कारण मी 17 वर्षाच्या गॅप नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे हा प्रश्न होता पण मुलांनी समजून घेतलं वैभव,आशिष यश नारायण यश हे नेहमीच अभ्यासात मदत करतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते. मग ते परीक्षेच वेळापत्रक असो किंवा नोट्स असो वेळोवेळी सांगतात डॉ. ज्योती गगनग्रास मॅडम वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यामुळे अधिक जोमाने शिकावे वाटते.
(6) तुम्ही इतर स्त्रीयांना महिला दिनानिमित्त काय सल्ला द्याल?
– कोणत्याही प्रसंगात संघर्ष हा केलाच पाहिजे,कागदावरच आरक्षण सत्यात आणण्यासाठी आजही महिलांनी संघर्ष केलाच पाहीजे ,त्याच बरोबर यशस्वी स्त्रीयांनी धडपडणाऱ्या स्त्रियांना साथ दिली पाहिजे शिक्षणाचा फायदा मुलींनी घेतला पाहिजे शिक्षण असले की सर्व काही शक्य होते आणि आपल्या भारतीय संस्कृती जपली पाहिजे सर्वांनी हाच महिला दिनानिमित्त सल्ला देईन.
– वैभव माने, कॉलेज रिपोर्टर, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड