मुंबई : रणजी क्रिकेट स्पर्धेचे सर्वाधिक विजेतेपद पटकाविणा-या मुंबई संघाचे यंदा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सौराष्ट्रविरूध्दची लढत अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे.
Saurashtra vs Mumbai – Match Drawn Saurashtra took first innings lead #SAUvMUM @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/tRrjpgSbCE
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 7, 2020
पहिल्या डावात २६२ धावा केल्यानंतर मुंबईने सौराष्ट्राचा पहिला डाव ३३५ धावांवर रोखला. ७३ धावांची पिछाडी भरून काढताना मुंबईने आपला दुसरा डाव ७ बाद ३६२ धावांवर घोषित केला व सौराष्ट्रसमोर विजयासाठी २९० धावांचे आव्हान ठेवले.
अखेरच्या दिवशी सौराष्ट्राने आपल्या दुस-या डावात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. यावेळी मुंबईला विजयाची संधी होती. मात्र सौराष्ट्राच्या तळातील फलंदाजांनी सामना वाचविण्यात यश मिळाले. कमलेश मकवाना आणि धर्मेंद्रसिंह जडेजा या जोडीने संपूर्ण सत्र खेळून काढत मुंबईची निर्णायक विजयाची संधी हुकवली.
या सामन्यात मुंबईला विजयाची निंतात गरज होती. मात्र, सामना अनिर्णित राहिल्याने मुंबईचे रणजी स्पर्धेत बाद फेरीत स्थान मिळविण्याचे स्वप्न भंग झाले.