सातारा – हिट अँड रन कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदाला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला.पाच जिल्ह्यातील सुमारे अडीच हजारपेक्षा अधिक वाहन चालकांनी ट्रकची चाके थांबवल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पहिल्या दिवसाच्या संपामुळे किमान शंभर कोटी रुपयांचा फटका बसल्याची भीती व्यक्त होत आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा सातशे होऊन अधिक ट्रक चालक जैसे थे परिस्थितीत राहिल्यामुळे सातारा जिल्ह्यातही आणिबाणीची परिस्थिती दिसून आली
टॅक्सी रिक्षा मालवाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला या कायद्याच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी या कायद्याचा निषेध करून दुचाकी वाहन चालक, ट्रॅक्टर ट्रक चालवण्यासाठी चालकांना भीती वाटावी असा कायदा आहे, अशी टीका प्रकाश गवळी साताऱ्यात केली.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यास सुधारणा करून त्यात काही बदल केलेले आहेत नव्या सुधारणेनुसार रस्ते अपघातात एखाद्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अपघातग्रस्त संबंधित वाहन चालकाने मदत न केल्यास त्याला दहा वर्षाचा करावास आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे . या नवीन विधेयकाला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने जोरदार विरोध करून तातडीने बंदचे आवाहन केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक लाखाहून अधिक ट्रकचालक आंदोलनाच्या पावित्र्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे 700 हून अधिक ट्रक चालकांनी वाहन चालवण्यास नकार दिल्याने सकाळी जाणारे जीवनावश्यक भाजीपाला, दूध ,कृषीमाल, फळे तसेच इतर पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे पहिल्याच दिवशी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शंभर कोटीचा फटका बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशामध्ये मध्यप्रदेश राजस्थान तसेच दहा राज्यांमधून पेट्रोल डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे. जिल्ह्यातही नागरिकांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसून आल्या. काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचा पुरवठा न झाल्याने भाज्यांची आवक मंदावली. त्यामुळे वाढीव दराने भाजीपाला घेण्याची वेळ सातारकरांवर ओढवली. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदन यांनी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्र शासनाची या संदर्भात चर्चा सुरू आहे, असल्याचे सांगितले.
सातारा जिल्ह्यामध्ये टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकारी तसेच दीडशेहून अधिक ट्रक चालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या संदर्भात निवेदन सादर केले. हा कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा अत्यंत कठोर आहे या कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी संप पुकारला आहे.
केंद्राने कायदा तत्काळ रद्द करावा – प्रकाश गवळी
या संपाला वाहतूकदारांचा पाठिंबा आहे. केंद्राने हा कायदा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी प्रकाश गवळी यांनी केली. टॅंकर चालकांच्या या संपामुळे त्याचा मोठा फटका इंधन वाहतुकीला सुद्धा बसला आहे लोणी काळभोर येथून जिल्ह्यामध्ये सुमारे 50 हजार लिटर अधिक इंधनाची आवक होते ती पहिल्या दिवशी ठप्प झाली. मात्र सर्व पंप चालकांकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनधारकांनी काळजी करू नये. येत्या काही दिवसात समन्वयक तोडगा निघून हा संप मिटेल, अशी आशा वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे.