पुसेगाव – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विविध मागण्या संदर्भात 18 पासून खटाव तालुक्यात आंदोलनास सुरुवात केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना खटाव शाखेतर्फे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांना देण्यात आले.
ग्रामपंचायतच्या विविध मागण्यांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राज्यातील नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, निवृत्तीवेतन लागू करणे व उपदान लागू करावे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ईपीएफ मध्ये वर्ग करण्यात यावी. किमान वेतनासाठी लावलेली वसुलीच्या रद्द करावी तसेच जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून दहा टक्के प्रमाणे वर्ग तीन व चार पदावर नियुक्ती करणे आँगस्ट 2020 ते 22 पर्यंतचे थकीत वेतन त्वरित अदा करावे ,कलम ६१ रद्द करणे आदी मागण्या केल्या आहेत या मागण्या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचारी 18 ते 20 डिसेंबर पर्यंत काम बंद आंदोलन करीत आहेत .असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे, खटाव तालुका अध्यक्ष गणपतराव फडतरे, सचिव जे. के. काळे, चंद्रकांत घाडगे, विद्या निंबाळकर, बेबी हजारे, जयश्री भोसले, अमोल काळोखे, सुनील शिंदे, संजय कदम, रामचंद्र चिंचकर, अशोक साठे, दिलीप गोरे, संतोष कांबळे, प्रमोद कोळी, चेतना मखरे, विकास भोसले, महादेव बागडे, राजू तूपे, यशवंत माने आदी तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.