वाई – केंद्र सरकारने 143 खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नुकतेच केंद्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या पक्षातील 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले. केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. 13 डिसेंबर 2024 रोजी संसदेत सुरक्षा व्यवस्था तोडून संसदेत पिवळा धुर पसरवण्यात आला ही बाब अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या गोष्टीची चौकशी न करता उलट इतर पक्षातील खासदारांचे निलंबन केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ही अतिशय चुकीची घटना झाली असून त्याचा निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत करण्यात आला.
या वेळेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस जयदीपदादा शिंदे, वाई तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास बापू पिसाळ, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस अतुल संकपाळ, सेवादल वाई तालुकाध्यक्ष काशिनाथ पिसाळ, वाई तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरचिटणीस संदीप नेवसे, वाई विधानसभा युवक अध्यक्ष सचिन काटे, पांडुरंग शिंदे, नामदेव दौंड, किशोर पाटील, राजकुमार जगताप, माधवी तांबे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.