वाघोली, (प्रतिनिधी)- आई, वडिलांकडून मिळालेले संस्कार हे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन भाजप नेते प्रदीप कंद यांनी केले. वाघोली येथील यशस्वी उद्योजक संतोष देशमुख यांचे वडील ज्ञानोबा देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम प्रसंगी कंद बोलत होते.
संतोष देशमुख यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द ही शून्यातून निर्माण केली आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव या परिसरात आदराने घेतले जाते, ते यशस्वी उद्योजक आहेतच. पण त्याचबरोबर आपण समाजाप्रती काहीतरी देणे लागतो, ही या भावनेने ते समाजासाठी काम करत असतात. वाघोली येथील वाघेश्वर मंदिरास त्यांनी आईच्या स्मरणार्थ २२ लाख रुपये चांदीचा मुकुट अर्पण केला आहे.
यशस्वी उद्योजक आणि समाजकारण करत असताना त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार व आशीर्वाद निश्चितच महत्त्वाचे आहेत असल्याचे कंद यांनी सांगितले. याप्रसंगी वाघेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, चंद्रकांत कोलते, माऊली कटके, पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, बापूसाहेब कंद, राजेंद्र पायगुडे, वाघोली मधील नागरिक नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.