पुणे : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) कर्मचारी संघटनेची (पश्चिम महाराष्ट्र) द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी संजय शेखरे यांची निवड करण्यात आली, तर सचिवपदी सतीश बाबर आणि खजिनदारपदी मच्छिंद्र दिवटे हे बहुमताने निवडून आले. या निवडणुकीसाठी मनोज उरमाले यांनी निवडणूक प्रमुख म्हणून तर संजीत कुमार, कविश्वर रेहपाडे यांनी सहायक निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले.
या निवडीनंतर नवीन कार्यकारीणीच्या वतीने निवडणूक प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सर्व सदस्यांनी आगामी काळात एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या हिताचे काम करण्याचे आवाहन सचिव सतीश बाबर यांनी केले.
निवडून आलेली कार्यकारीणी उपाध्यक्ष (पुणे विभाग) अमित साळगावकर, उपाध्यक्ष सोलापूर विभाग पद्माकर रिकीबे (बिनविरोध), सहसचिव दत्तात्रय शिंदे, प्रणव चव्हाण, सहखजिनदार नीरज कुमार यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारीणी सदस्यपदी सुभाष शिंदे, संजीत कुमार, देवेंद्र हिले, योगेश जाधव, उत्तम चव्हाण (बिनविरोध) कोल्हापूर विभाग, झुबैर अंसारी यांची निवड झाली.