Nitish Kumar – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज एक मोठे पाऊल उचलत आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन आपल्या मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. नितीश हे इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते होते मात्र त्यांनी काँग्रेस नेनेतृत्वात काम करण्याची इच्छा न दाखवता भाजपचा पाठींबा घेणं पसंत केल्याने याचा इतर राज्यांवर देखील परिणाम होणार असल्यास बोललं जात आहे. अशात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यची खोचक टिपण्णी केली आहे.
नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी नितीश यांच्यावर भाष्य केलं आहे. अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
अहमदनगरमध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्या आहेत. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्या होत्या अशी टीका देखील संजय राऊत यांनी अहमदनगरच्या स्थानिक राजकारणावर केली.
नितीश यांच्या या नव्या निर्णयामुळे बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्यांची युती तुटली. आता नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप सक्रिय होणार आहे.