मुंबई – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांच्या एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजूनही शेतकरी आणि सरकारमध्ये कृषी कायद्यातील मुद्द्यांवरुन मतभेद सुरुच आहेत. यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकरांशी बोलतांना शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारला निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
‘मोदी सरकार हे ‘झिरो स्टँडर्ड’ आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल.’ असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.