उत्तर प्रदेशात निवडणूकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठ-मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येत असून एका सभेदरम्यान नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. भाजपच्या जाहीर सभेला संबोधित करताना निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय निषाद यांची जीभ घसरली आहे. निषाद यांच्या वक्तव्यावर जोरदार टाळ्या वाजल्या होत्या, मात्र सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
”आम्ही मोदींशी बोलतो, अमित शहांसोबत बोलतो, योगी यांच्याशी बोलून गरज पडल्यास पोलीस ठाणे जाळून न्याय मिळवून देऊ.” असे विधान संजय निषाद यांनी केले आहे. निषाद यांनी जाहीर सभेत बोलताना हे विधान केले आहे.
बऱ्हाळ विधानसभेत भाजपच्या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पोलिस ठाणे जाळून न्याय मिळवू, असे त्यांनी सांगितले. हे ऐकताच नागरिकांनी टाळ्या वाजविल्या मात्र नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र वेगवेगल्या चर्चा सुरू झाल्या.