नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या भारतीय नागरीकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तातडीने प्रयत्न हाती घेतले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की तेथे अडकलेल्या भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांची स्थिती बिकट बनली आहे. बंकरमधील भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडीओ त्रासदायक आहेत. अनेक जण पूर्व युक्रेनमध्ये अडकले आहेत त्या भागावर जोरदार हल्ले होत आहेत.
त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने तातडीने सर्व पर्यायांचा वापर केला पाहिजे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. रशियाने युक्रेन मध्ये जे आक्रमण केले आहे त्याविषयीही मोदी सरकारने स्पष्ट आणि निसंदिग्ध भूमिका घेतली पाहिजे अशी जाहीर सूचना कॉंग्रेसने कालच केली आहे.