Sanjay Nirupam opposes Thackeray group candidate : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेस पक्षात विरोधाचा सूर उमटला आहे. ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम येथून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्या विरोधातही कॉंग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी आवाज उठवला आहे.
ठाकरे यांनी मुंबईतील चार उमेदवारांची घोषणा केली आहे व उद्या आणखी एकाचे नाव जाहीर केले जाईल. कॉंग्रेसला मुंबईत केवळ खैरात दिल्यासारखी एक जागा सोडण्यात आली आहे. मी याला विरोध करतो. दोन्ही पक्षांमध्ये बोलणी झाली त्याला मीही हजर होतो. उत्तर पश्चिममधून शिवसेनेने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असल्या खिचडी चोरासाठी मी प्रचार करणार नाही अशी रोखठोक भूमिका निरूपम यांनी मांडली आहे. करोना काळातील खिचडी वाटपात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणाच्या अनुशंगाने त्यांनी किर्तीकर यांचे नाव न घेता हा निशाणा साधला. | Sanjay Nirupam opposes Thackeray group candidate
कॉंग्रेस पक्षालाच निशाणा करताना ते म्हणाले की पक्षनेतृत्वाने बऱ्याच दिवसांपासून माझ्याशी चर्चा केली नाही. कॉंग्रेस पक्ष सगळीकडे न्यायाच्या भरपूर गोष्टी बोलतो, मात्र आपल्याच लोकांकडे दुर्लक्ष करतो. मी अनेक वर्षांपासून माझ्या भागात काम करतो आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांनी शिवसेनेपुढे हार मानली. पक्षाच्या नेतृत्वाला मी दोन आठवड्यांची मुदत देतो आहे. जर वेळीच त्यांनी निर्णय घेतला नाही तर मी स्वतंत्रपणे माझा निर्णय घेईन. आता आरपारची लढाई होईल असा इशाराही संजय निरूपम यांनी दिला. | Sanjay Nirupam opposes Thackeray group candidate
ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील सांगलीवर आमचा दावा होता. मात्र ज्या पध्दतीने शिवसेनेने ती जागा कॉंग्रेसकडून हिसकावून घेतली त्यावरून कदाचित कॉंग्रेस संपवण्याचा त्यांचा छुपा अजेंडा असू शकतो. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग पत्करल्याबद्दल निरूपम म्हणाले की ते बडे नेते आहेत. सगळ्यांनी एकत्र यावे अशी आमची इच्छा होती. मात्र त्यांच्या मागण्या काही जास्तच होत्या. तुम्ही शिंदे गटात जाणार का विचारल्यावर सर्व पर्याय खुले असल्याचे नमूद करून ते म्हणाले की जेंव्हा जाईन तेंव्हा सगळ्यांना ते कळेल. | Sanjay Nirupam opposes Thackeray group candidate
प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार ? मनोज जरांगे पाटील म्हणाले,”पाठिंबा द्यायचा..”
युसुफ पठाण विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार ! ‘या’ कृतीवर आक्षेप घेत केली कारवाईची मागणी