Manoj Jarange On VBA Yuti : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर जरांगे आणि वंचितमध्ये युती होणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. जरांगे यांच्याशी भेट झाल्यानंतर सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. अशात आता वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणार का याबाबत स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे.
प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमेदवार देणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी यापूर्वी केली आहे. त्यानुसार गावागावात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याच्या आवाहन देखील त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. अशात आंबेडकर यांच्यासोबत आमची भेट झाली पण आमचा निर्णय ३० तारखेला होणार आहे असं स्पष्ट मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
जर समाजाकडून हो आलं तर राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात असा इशारा देखील यावेळी जरांगे यांनी दिला. मराठा,दलित,मुस्लिम आणि धनगर बांधव एकत्र आले तरी सगळ्यांचा धूर निघेल अनेकांचा कार्यक्रम वाजेल असं देखील जरांगे यांनी यावेळी म्हंटले. | Manoj Jarange On VBA Yuti
वंचितला पाठिंबा द्यायचा ठरला तर समाजाला विचारावं लागेल.परंतु तूर्तास काहीही ठरलेलं नाही ३० तारखेला पूर्ण भूमिका ठरेल त्यानंतर काहीही घडू शकत. जर समाजाकडून हो आलं तर ३० तारखेला राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात असा सूतोवाच देखील जरांगे यांनी यावेळी केला. | Manoj Jarange On VBA Yuti
३० तारखेला मोठा निर्णय
जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना ३० तारखेपर्यंत प्रत्येक गावा गावात जाऊन अपक्ष उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ३० तारखेला जरांगे स्वतः उमेदवार देण्याबाबतची नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. | Manoj Jarange On VBA Yuti
युसुफ पठाण विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार ! ‘या’ कृतीवर आक्षेप घेत केली कारवाईची मागणी
CM Arvind kejriwal health: कोठडीत केजरीवालांची प्रकृती खालावली, ‘साखरेची पातळी घसरली…’