Sangli | Thackeray group | Sanjay Raut – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले. सांगली लोकसभा ही ठाकरे गटासाठी सुटल्याने काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेमंडळींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंती केली.
यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, विश्वजित कदम किंवा विशाल पाटील सांगलीत काम करत आहेत, तरीही गेल्या काही वर्षांपासून त्याठिकाणी जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार लढणे गरजेचा आहे.
संजय राऊत म्हणाले, विश्वजित कदम किंवा विशाल पाटील असतील त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो. ते काँग्रेस पक्षाचे जुने जानते कार्यकर्ते आहे. सांगलीत ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत. तरीही गेल्या काही वर्षांपासून सांगलीत जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे.
प्रत्यक्ष सांगलीमध्ये विधानसभेला संघाचा माणूस निवडून येतो. मिरजेत संघाचा माणूस निवडून येतो. दंडली घडवल्या जातात. हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांगलीमध्ये भाजपचे खासदार निवडून येत आहेत. त्यामुळे भाजपशी त्याठिकाणी टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार लढणे गरजेचा आहे, ही जनभावना आहे.