बक्सर – गेल्या पाच वर्षांत मी माझ्या परीने सर्वसामान्यांसाठी काम केले. केंद्रिय मंत्रिपद उपभोगतानाही मी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले नाही. असे असूनही माझी उमेदवारी नाकारण्यात आली. याचा अर्थ यामागे काही तरी षड्यंत्र नक्कीच रचले गेले आहे, अशा शब्दांत केंद्रिय मंत्री अश्विनी चौबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (‘Conspiracy hatched against me’, Ashwini Chaubey reacts after being denied ticket from Buxar)
या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी भाजपने अनेक दिग्गजांची तिकिटे रद्द केली आहेत. पक्षाने काही दिग्गज नेत्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांवर बाजी मारली आहे. अश्विनी चौबे यांना बक्सर लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांची व्यथा आता समोर येत आहे.
आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये चौबे म्हणतात की, पक्षाला काय समजले आणि काय नाही हेच कळत नाही, पण हो काही कारस्थानं होते, ते निवडणुकीनंतर उघड होतील. नामनिर्देशनपत्रे अजून बाकी आहेत आणि अजून बरेच काही व्हायचे आहे. मी फक्त बक्सरमध्येच राहीन.