मुंबई – ‘आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो कधीच अभ्यास करत नव्हता, पण वर्गात पहिला यायचा. एकतर तो खूप हुशार होता किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला व्हायचा. असेच मुंख्यमंत्र्यांचेही झाले आहे,’ अशा शब्दात संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. तसेच, नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलं तरी काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे विचारला आहे.
अजूनही निर्बंध शिथिल नाही. सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 15, 2021
उद्धव ठाकरे ‘नंबर 1’ मुख्यमंत्री, 13 राज्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर
‘उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं मात्र..’
दरम्यान, प्रश्नम या संस्थेने त्यांचा त्रैमासिक अहवाल जाहीर केला. यात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. यावरुन आता राज्यातील विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.