नाशिक – नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज साहित्य संमेलनाचा आजचा अखेरचा दिवस. आज दुपारी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली. त्याच्या वादग्रस्त ठरत असलेल्या “रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” पुस्काकातील लिखाणावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतं.
दरम्यान कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीचं संभाजी ब्रिगेडने समर्थन केलं आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे नितीन पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी पाटील यांना पुस्तकांच नाव विचारण्यात आलं. मात्र त्यांना नाव सांगणं अत्यंत कठीण झालं होतं.
नितीन पाटील यांनी वारंवार कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव विचाऱण्यात आलं.
त्यावर त्यांनी सोबत असलेल्या काहींना पुस्तकाचं नाव विचारलं. मात्र त्यांनाही नाव सांगता आलं नाही. त्यानंतर पाटील यांनी कुणाला तरी फोन करून पुस्तकाचं नाव विचारलं. तरी देखील त्यांना पुस्तकाचं संपूर्ण नाव सांगता आल नाही.