मुंबई – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आयुष्यावरील संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर होता. ही टोळी सलमानला सतत आपले टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच लॉरेन्सने सलमान खानबद्दल मोठे वक्तव्य केले असून, सलमान खानला माफी मागावी लागेल असे म्हटले आहे.
लॉरेन्सने सुपरस्टार सलमान खानला काळवीटाच्या घटनेबद्दल बिष्णोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्याच्या या धमकीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेता सलमान खानने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानने दिलेल्या या उत्तराचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. यावेळी सलमान एका पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याला तू सगळ्यांचा भाईजान आहेस, मात्र तुला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात त्यासंबंधी काय वाटतं? असं विचारण्यात आलं.
या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान म्हणाला की.., “मी संपूर्ण भारताचा भाईजान नाही… मी अनेकांचा जीवही आहे.. भाईजान त्यांच्यासाठी आहे जे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी ज्यांना मी बहिण बनवू इच्छितो..”. असं सलमान यावेळी म्हणाला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देण्यास सुरवात केली आहे.