नवी दिल्ली : नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ३१२ पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. यात १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांचा समावेश आहे.
या कामगिरीबदल भारत सरकार भारतीय खेळाडूंचा सन्मान करणार आहे. सन्मानार्थ दक्षिण आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय खेळाडूंना भारत सरकारने पारितोषिके जाहीर केली असून, १७४ सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी १.५ लाख रूपये, रौप्यपदकविजेत्यांना १ लाख आणि कांस्यपदकविजेत्या खेळाडूंना ५० हजार रूपये इतके बक्षीस दिले जाईल, असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.
Sports minister @KirenRijiju, in the presence of IOA Gen. Secy. @rajeevmehtaioa , felicitated #SAG2019 medallists for their brilliant performance in Nepal! The overall medal tally stood at 312.
The cash prizes for medallists:
Gold: ₹1.5 lakh
Silver: ₹1 lakh
Bronze: ₹50k pic.twitter.com/mNGfjgXTEP— SAI Media (@Media_SAI) December 11, 2019
सांघिक प्रकरांमुळे प्रत्येक खेळाडूला हे बक्षीस मिळणार असल्याने ही रक्कम आणखी वाढणार आहे.