सोरतापवाडी – उरुळी कांचन येथील मणिभाई महाविद्यालयातील विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. या रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा. तसेच महात्मा गांधी विद्यालयातून बंद केलेला रस्ता पुन्हा खुला करावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. विशेष म्हणजे रोड रोमिओंना पोलिसांचा धाक न राहिल्याने ते विद्यार्थिनींना लक्ष्य करीत आहेत.
महात्मा गांधी, मणिभाई देसाई यांच्या नावामुळे सर्वत्र नावाजलेले उरुळी काचंन गाव हे रोडरोमिओंचे गाव म्हणण्याची वेळ विद्यार्थिनींवर आली आहे. कारण रोडरोमिओ त्यांना त्रास देत आहेत. तसेच उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थांना महात्मा गांधी विद्यालयातून जाण्यासाठी बंदी असल्यामुळे लांबून अर्धा किलोमीटर वरून प्रवेश असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
आष्टापूर येथे काही युवकांनी चार शिक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे रोडरोमिओंना पोलिसांची धास्ती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्या शिक्षकाने जाब विचारला रोडरोमिओंना विचारला तर त्यांच्याकडून शिक्षकांना मारहाण व अपमानास्पद वागणूक मिळत आहे.