निवडी बिनविरोध; व्हाइस चेअरमनपदी लक्ष्मी गायकवाड
मसूर (प्रतिनिधी) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्रि साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. रविवार, दि. 9 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची चेअरमनपदी तर व्हा. चेअरमनपदी लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी उपनिबंधक मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. या बिनविरोध निवडीबद्दल संचालक मंडळाने ना. पाटील व लक्ष्मी गायकवाड यांचे अभिनंदन केले. ना. पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. पी. डी. पाटील यांच्या विचाराने कारखान्याचे कामकाज सुरू आहे. सुमारे 37 हजार सभासदांच्या सहकार्यामुळे यंदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राहिमतपुरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशबापू पाटील, अरूणकाका पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, माजी सभापती सौ.शालन माळी, जि.प.सदस्या सौ.सुरेखा जाधव, विनीता पलंगे, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुंखे, लालासाहेब पवार मांडवेकर, शिवाजीराव फाळके, सुरेश पाटील बापू, रमेश चव्हाण, ऍड.मानसिंगराव पाटील, गोपाळराव धोकटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, निवासराव पाटील तांबवेकर, ऍड.चंद्रकांत कदम, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसो चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी, मार्केट कमीटीचे माजी सभापती दाजी पवार, विद्यमान सदस्य अंकुश हजारे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बॅंकेचे संचालक सागर पाटील दादा, उमेश कदम, हिंदकेसरी संतोष वेताळ, पांडुरंग गणपती थोरात, गोविंदराव थोरात, शंकरराव पाटील, भिमराव ढमाले, गंगाधर जाधव, संभाजीराव गायकवाड, शिवाजीराव घाडगे, भरत गायकवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलग 25 वर्षे चेअरमन…
राज्यात साखर उत्पादनासह रिकव्हरी व ऊस दरामध्ये अग्रगण्य असलेल्या सह्याद्रि साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. पी. डी. पाटील यांच्या विचारावर चालणाऱ्या सह्याद्रि साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठिशी राहिला आहे. या कारखान्याचे हित, सभासदांचे अर्थकारण जाणणारे ना. बाळासाहेब पाटील हे सलग 25 वर्षे चेअरमन आहेत.