नवी दिल्ली – माजी क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी देशातील क्रीडा क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडवले. त्यांनी खेळांनाच केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. त्यांचा हाच वारसा पुढे नेईन, अशा शब्दात देशाचे नवे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच देशाचे 17 वे केंद्रीय क्रीडामंत्री म्हणून पदभार स्वीकारला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेले ठाकूर यांच्याकडे माहिती आणि दूरसंचारमंत्री अशी खाती देण्यात आली आहेत.
भारताचे खेळाडू 23 जुलैपासून होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होत आहेत. रिजीजू यांनी केलेले कार्य यापुढेही सुरू ठेवणार आहे. देशातील खेळांच्या भवितव्यसाठी मी कार्य करणार आहे, असेही ठाकूर म्हणाले.