नवी दिल्ली :- देशात समान नागरी कायदा लागू करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यावर विरोधी पक्षांनी सदविवेक बुद्धीने विचार करावा आणि जातीय राजकारणापासून दूर राहावे असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी केले आहे.
ते म्हणाले की ही सर्वसमावेशक सुधारणा अंमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. एकसमान नागरी कायदा सर्वांसाठी समानता आणि न्याय” सुनिश्चित करेल असे ते म्हणाले.
देशाचा मूड समान नागरी संहिता लागू करून जातीय कटकारस्थानांच्या तावडीतून मुक्त होण्याचा आहे, ज्यांनी आपल्या संकुचित स्वार्थासाठी गेली सात दशके याबाबतच्या कायद्याला ओलीस ठेवले होते, असा आरोप नक्वी यांनी केला.
1985 मधील कॉंग्रेसची “क्षणाची चूक” ही देशासाठी “दशकांची शिक्षा” ठरली, असा आरोप नक्वी यांनी केला. त्यावेळी शाह बानो प्रकरणात सरकारला एक चांगली संधी आली होती. पण या सुधारणेवर त्यांनी जातीय स्वरूपाच हल्ला केला आणि संसदेतील आपल्या संख्याबळाचा वापर करून मुस्लिम महिलांना न्यायापासून वंचित ठेवले असे ते म्हणाले.
दुर्दैवाने, आज कॉंग्रेस सुधारण्याऐवजी आपल्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.