नवी दिल्ली – केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचे ठरवले असून सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू विपणन वर्षात अतिरिक्त 1.2 दशलक्ष टनांच्या निर्यातीला अनुमती देण्याचे सरकारने निश्चित केले आहे.
चालू मार्केटिंग वर्षात केवळ दहा लाख टन साखर निर्यातीला सरकारने अनुमती दिली होती. आता ही मर्यादा वाढवली जाणार असल्याने शिल्लक साखरेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
येथे एका कार्यक्रमाच्या प्रसंगी अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, सरकार आणखी 1.2 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देईल. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल, असे ते म्हणाले.
सातारा : नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम; संपूर्ण घरपट्टी भरलेल्या सातारकरांना…
मागील वर्षी 5.96 दशलक्ष टन साखर निर्यात झाली होती. देशांतर्गत साखरेचा तुटवडा होऊ नये आणि देशांतर्गत साखरेचे भाव वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर मर्यादा आणली होती.
मुंबई पोलिसांचे केदार दिघे यांना समन्स; बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी