Sharad Pawar: केंद्र सरकारने यंदा पाच जणांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे. एकाच वेळी इतक्या लोकांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नरेंद्र मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा सर्वप्रथम केली. त्यानंतर काही दिवसांनी हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, पी.व्ही. नरसिंह आणि एमएस स्वामीनाथन यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संस्थापकाने लस निर्मिती क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली.
काय म्हणाले शरद पवार?
पुण्यातील एका पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीरम इन्स्टिट्यूटची लस करण्यात पुनावाला यांचे योगदान किती मोठे आहे, याबाबत त्यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले, “जगात जेव्हा पाच मुले जन्माला येतात, तेव्हा त्यातील तीन मुलांना सीरमची लस दिली जाते. तसेच कोरोना या साथीच्या काळात सीरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण जगाला लस पुरवली. आफ्रिकन देशांमध्ये ही लस मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली आणि त्यासाठी सायरस पुनावाला आणि त्यांच्या टीमने लोकांना लस पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली होती.”
“सायरस पुनावाला आणि त्यांच्या टीमने महामारीचा मुकाबला करण्यासाठी लस कमी पडणार नाही, याची जबाबदारी घेतली होती. लसींच्या क्षेत्रात सायरस पुनावाला यांचे कार्य अतुलनीय आहे. यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान करणे हे आम्हाला ते योग्य वाटले नाही, पण नंतर त्यांना पद्मभूषण देण्यात आले. आज जगातील नवीन पिढी लसींच्या क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे योगदान पाहता सरकारने त्यांना पद्मभूषण पुरते मर्यादित न ठेवता त्यांना भारतरत्न दिले पाहिजे,” असे शरद पवार म्हणाले.