मुंबई – मुंबई पोलिसांनी २ जानेवारीपर्यंत शहरात संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कलम 144 लागू करून पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय 4 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत शस्त्रांवरही बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि कोणत्याही प्रकारची निदर्शने करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
२ जानेवारीपर्यंत मुंबईत काय बंदी असेल ?
-मुंबईत 2 जानेवारीपर्यंत लाऊडस्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल.
-विवाह समारंभ, अंत्यसंस्कार मेळावे, स्मशानभूमीच्या मार्गावर मिरवणूक, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या मोठ्या सभांना बंदी घालण्यात आली आहे.
-न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल. याशिवाय शाळा-महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील सभांनाही बंदी घालण्यात आली आहे.
-सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.
– मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
-यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
-या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.