मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच मुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू आहे.
दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वीच राज्यपालांना बदलण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान राज्यपालांच्या बदलीची शक्यता आहे. पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. तर, येत्या 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आणि त्यापूर्वीच त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.
अन्यथा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी हा मुद्दा प्रामुख्यानं उचलणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच सध्या भगतसिंह कोश्यारी यांना बदलण्याच्या हालचाली जोर धरू लागली आहे. यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुण्यात काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील पाणी पाणीपुरवठ्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विरोधीपक्ष नेते अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. “त्यांना जायचंय तर जाऊ द्या..’, असे पवार यांनी म्हटले आहे.
नेमकं अजित पवार काय म्हणाले?
यावेळी बोलताना पवार म्हणाले, “महापुरुषांबद्दल बोलत असताना अशी वक्तव्ये करू नयेत की ज्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातील आणि रागाने त्याचा उद्रेक होईल. 5 डिसेंबरला गुजरात विधानसभेसाठी मतदान आहे. ते झाल्यावर कदाचित राज्यपालांवर कारवाई केली जाईल. तसेच ज्यांनी हे विधान केलं त्यांना देखील आपल्या महाराष्ट्रात राहायचं नाही. तेही म्हणतात हमे जाना है अरे जाना है तो जाने दो…’ असं अजित पवार म्हणाले.