वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. रोज नव्याने रुग्णांच्या आकड्याची नोंद होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर शहरातील अत्यावश्यक सेवांविषयी स्थानिक प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक कारणे सांगून रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता सोलापूर पालिका प्रशासनाचा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरात आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता किराणा दुकाने, भाजी मंडई आणि इतर सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानांना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येतेय.
शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.