सासवड – पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पुरंदर तालुका शिवसेनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली. यासंदर्भातील निवदेन तहसीलदारांना देण्यात आले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी यादव म्हणाले की, पुरंदर तालुक्यात महसूल यंत्रणेने सर्व नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर भरपाई मिळणे आवश्यक आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, नगरसेवक सचिन भोंगळे, महिला आघाडीच्या संघटक छाया सुभागडे, शहरप्रमुख अभिजित जगताप, पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, युवासेनेचे समन्वयक गणेश मुळीक, उमेश गायकवाड, हरिभाऊ लोळे, ऍड. गालिब इनामदार, अनिल ढवळे, राजू शिंदे, रामदास कटके, हिरामण खेडेकर, संपत सणस यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.