सातारा, (प्रतिनिधी) – रिपाइंच्यावतीने (अ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ईव्हीएममध्ये गडबडी होत असल्याने लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवणे गरजेचे आहे. रिपाइं (अ) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. देशातील आयटी तज्ज्ञ ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील वकीलही यात सहभाग घेत आहेत. ईव्हीएम हटवून लोकशाही वाचवण्यासाठी रिपाइंदेखील आंदोलनात उतरली आहे. ईव्हीएम हॅक करता येऊ शकते.
अमेरिका, चीन, इंग्लंड, जपान, फ्रान्स आदी अनेक प्रगत देशांमध्ये त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. लोकशाही वाचवली, तरच देश वाचणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर दादासाहेब ओव्हाळ, जावेद शेख, सागर फाळके, सुरेश पवार, संतोष चव्हाण, योगेश माने, आनंदा गाडीवडार यांच्या सह्या आहेत.