पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या हेल्परच्या कुटुबियांना घटनेनंतर ६ वर्षांनी दिलासा मिळाला आहे. शनिवारी (दि. ९) झालेल्या लोकअदालतमध्ये विमा कंपनी आणि कुटुबियांमध्ये झालेल्या तडजोडीमध्ये २६ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात अॅड. जी.पी.शिंदे आणि अॅड. सतिश घरत यांनी बाजू मांडली. तर विमा कंपनीच्या वतीने अॅड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले. तो ४३ वर्षीय १२ डिसेंबर २०१७ रोजी दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी कात्रजच्या हद्दीत विटेच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी, लहान मुलगा आणि आईने अॅड. जी.पी.शिंदे आणि अॅड. सतिश घरत यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे २०१८ दावा दाखल केला. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.
त्याला दरमहा १४ हजार ५०० रुपये पगार होता आणि कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करून जास्तीत जास्त भरपाई देण्याची मागणी केली. मध्यला काळात असलेल्या करोनामुळे हा दावा लांबला होता. हा दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला. कुटुंबिय आणि विमा कंपनीमध्ये रक्कमेवर एकमत झाले. हा दावा निकाली निघाला