नवी दिल्ली :- देशात 2021-22 हंगामात 5,000 लाख टनांपेक्षा जास्त ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. या उत्पादित उसापैकी साखर कारखान्यांनी सुमारे 3,574 लाख टन उसाचे गाळप करून सुमारे 394 एलएमटी साखर तयार केली, त्यापैकी 36 एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आली आणि 359 एलएमटी साखर कारखान्यांनी तयार केली असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारत आता साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ब्राझीलनंतर साखरेचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. प्रत्येक साखर हंगामात, साखरेचे उत्पादन सुमारे 320-360 लाख मेट्रिक टन होते, आणि त्यातील 260-280 लाख मेट्रिक टन साखर देशांतर्गत वापरात आणली जाते.
देशात न विकल्या गेलेल्या साखरेचा मोठा साठा साखर कारखान्यांकडे शिल्लक राहतो. त्यामुळे साखर कारखान्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने जून 2018 मध्ये साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ही संकल्पना मांडली आणि साखरेचा एमएसपी 29 रुपये प्रति किलो निश्चित केला, ज्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात आली.
Kerala : वायनाड बनला अदिवासींच्या कागदपत्रांचे डिजीटायझेशन करणारा पहिला जिल्हा
फेब्रुवारी 2019 मध्ये 31 रुपये प्रति किलो असा एमएसपी दिला गेला. साखर क्षेत्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचा गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी केलेला हा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरला आहे असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.