नवी दिल्ली – सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने केंद्र सरकारकडे सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे.
न्यायाधीश आर. एफ. नरिमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 25 इतकी राहिली आहे. सर्वोच्च न्यायालयातील मंजुर न्यायाधीशांची पदे 34 इतकी आहेत.
गेल्या दोन वर्षात या कोर्टात नवीन न्यायाधीशांची नियुक्तीच झालेली नाही. ज्या नऊ नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यात न्या. नागरथना, न्या. हिमा कोहली, न्या. बेला त्रिवेदी या तीन महिला न्यायाधीशांच्या नियुक्तीचीही शिफारस करण्यात आली आहे असे सांगण्यात येते.
या खेरीज पी.एस. नरसिंहा,अभय श्रीनिवास ओक,विक्रम नाथ, जितेंद्रकुमार महेश्वरी, सी. टी. रविकुमार, आणि एम. एम. सुंदरेश यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे.