RBI Bulletin – रिझर्व्ह बँकेने किरकोळ किमतीवर आधारित महगाईचा दर चार टक्क्यापेक्षा कमी पातळीवर यावा यकरिता एक वर्षापासून आपले व्याजदर उच्च पातळीवर ठेवले आहेत. मात्र तरीही अन्नधान्याच्या किमती कमी होत नाहीत. त्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 4% पेक्षा जास्त आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या मार्च महिन्यासाठीच्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यापासून किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर काही प्रमाणात कमी झाला असला तरी फेब्रुवारीमध्ये तो 5.09% इतका भरला आहे. तो दर चार टक्क्यापेक्षा कमी असावा, असे सरकारने रिझर्व्ह बँकेला सांगितले आहे. त्याचबरोबर जोपर्यंत हा दर चार टक्क्यापेक्षा कमी होत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँक व्याज दरात कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकत नाही, असे समजले जाते.
घाऊक महागाईचा दर शून्य टक्क्याच्या जवळ आहे. त्याबद्दल समाधानकारक परिस्थिती आहे. मात्र किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा जर अजूनही 5% पेक्षा जास्त आहे. कारण अचानक कधी भाजीपाल्याच्या तर कधी अन्नधान्याच्या किमती वाढतात. जोपर्यंत खात्रीने अन्नधान्याच्या किमती कमी होत नाहीत तोपर्यंत महागाईचा दर चार टक्क्यापेक्षा कमी होणार नाही.
तिसर्या तिमाहित विकासदर 8.4% आहे. तो सहा तिमाईतील उच्चांक आहे. सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्यामुळे विकास दर वाढत आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर भरणा वाढत आहे. सरकारने अनुदान कमी केले असल्यामुळे सरकारची वित्तीय तूट कमी होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढलेली नाही. आगामी काळात ती गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक परिस्थिती खराब
भारताचा विकासदर जरी जास्त असला तरी जागतिक परिस्थिती खराब आहे. कारण जागतिक पातळीवर दोन युद्ध चालू आहेत. त्याचबरोबर जागतिक व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला जगतून जास्त आधार मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अहवालात सुचित करण्यात आले आहे. मात्र भारत अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या आधारावर सध्या उत्तम कामगिरी करीत आहे.