अहमदाबाद – रवीचंद्रन अश्विनने सातत्याने कॅरम बॉलच्या प्रेमात पडण्यापेक्षा मूळ ऑफ स्पीन गोलंदाजीवरच भर द्यावा, असे परखड मत राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी व्यक्त केले आहे.
गुजरातविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम लढतीत अश्विनला धावा रोखण्यात तसेच बळी मिळवण्यात याच कॅरम बॉलच्या सातत्याने टाकण्यामुळेच अपयश आले. खरेतर तो जेव्हा त्याच्या मूळ ऑफ स्पीन गोलंदाजीवर भर देतो तेव्हा तो या दोन्ही बाबतीत यशस्वी ठरतो. येत्या काळात त्याने असे प्रयोग टाळावेत, असेही संगकारा म्हणाले.