Ravichandran Ashwin, R Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर शुक्रवारी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली. संघाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा सामना अर्धवट सोडून चेन्नईतील आपल्या घरी परतला.
बीसीसीआयने सांगितले की, कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे रविचंद्रन अश्विनने तत्काळ कसोटी संघातून माघार घेतली आहे. ही माहिती रात्री उशिरा बीसीसीआयने दिली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले होते,त्यात म्हटले होते की, “कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे रविचंद्रन अश्विनने तत्काळ कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात बीसीसीआयचे सहकारी, खेळाडू आणि कर्मचारी यांचा रविचंद्रन अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा आहे. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे.” पुढे म्हटले आहे की, अश्विन हा आव्हानात्मक काळातून जात आहेत. त्यामुळे अश्विन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यामुळेच बोर्डाने नेमकं काय घडलं याची माहिती दिली नाही.
R Ashwin withdraws from the 3rd India-England Test due to family emergency.
In these challenging times, the Board of Control for Cricket in India (BCCI) and the team fully supports Ashwin.https://t.co/U2E19OfkGR
— BCCI (@BCCI) February 16, 2024
पण नेमकी काय घटना घडली याबाबत बीसीसीआयने सखोल माहिती दिली नसली तरी बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी की वैद्यकीय आणीबाणी अश्विनच्या आईशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर अश्विनने तिसरी कसोटी अर्ध्यावर सोडून घरी परतण्याचे कारण समोर आले आहे.
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “अश्विनच्या आईची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी मी कामना करतो. त्यासाठी त्याला राजकोट कसोटी सोडून आईकडे चेन्नईला जावे लागले.”
Wishing speedy recovery of mother of @ashwinravi99 . He has to rush and leave Rajkot test to Chennai to be with his mother . @BCCI
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) February 16, 2024
दरम्यान, अश्विन राजकोट कसोटीतून बाद झाल्याने भारत आता चार विशेषज्ञ गोलंदाजांसह ही कसोटी खेळणार आहे. अश्विनच्या जागी पडिक्कल मैदानात उतरला आहे, मात्र नियमानुसार तो फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकत नाही.