नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार T20 विश्वचषकानंतर संपत आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे. अशा परिस्थितीत आता रवी शास्त्री पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांना काही आयपीएल संघांनी प्रशिक्षकपदासाठी संपर्क केल्याचेही वृत्त आहे.
cricbuzz च्या वृत्तानुसार, अहमदाबादच्या नवीन टीमने रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी कोचिंग स्टाफशी संपर्क साधला आहे. अहमदाबाद त्यांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि आर. श्रीधरला गोलंदाजी प्रशिक्षक बनवणार असल्याचे म्हंटले जात आहे.
टी-२० वर्ल्ड कपनंतरच रवी शास्त्री यावर निर्णय घेऊ शकतात, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. यापूर्वी असा अंदाज वर्तवण्यात येतोय की रवी शास्त्री पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना दिसणार आहेत, त्यात त्यांनी गेल्या दोन दशकांमध्ये खूप नाव कमावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी शास्त्री यांना स्टार स्पोर्ट्स आणि सोनी स्पोर्ट्सने कॉमेंट्रीसाठी संपर्क साधला आहे. हे दोन्ही नेटवर्क भारतातील बहुतांश सामन्यांचे प्रसारण करतात. मात्र, ते आयपीएल संघाचे प्रशिक्षक झाले, तर त्यांचं कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचणं कठीण होऊ शकते.
पण सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण हा आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबादचा मेंटर आहे आणि इतर सामन्यांमध्येही तो कॉमेंट्री करताना दिसतो. अशा परिस्थितीत आता रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा करार कधी संपल्यानंतर टी-२० वर्ल्ड कपनंतरच सर्वकाही स्पष्ट होईल.
अहमदाबादच्या टीमला CVC ग्रुपने एकूण 5600 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर लखनौचा संघ संजीव गोएंका ग्रुपने 7 हजार कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला आहे. आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस मेगा लिलाव होऊ शकतो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की रवी शास्त्री बर्याच काळापासून कॉमेंट्री करत आहेत, टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011ला 50 ओव्हर वर्ल्ड कप जिंकला तेव्हा देखील रवी शास्त्री कॉमेंट्री करत होते. 2017 मध्ये टीम इंडियामध्ये प्रशिक्षक म्हणून सामील झाल्यानंतर ते काॅमेंट्री फिल्डपासून दूर आहेत.