Ravi Shastri – न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंसह संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने याअगोदरही काही मालिकांमध्ये संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौरा झाला तेव्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून लक्ष्मणने काम पहिले होते. दरम्यान, राहुल द्रविड यांच्या विश्रांतीबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
“त्याने आता पाकिस्तानचे कर्णधारपद सोडावे…”, बाबर आझमला घरचाच आहेर
एका पत्रकार परिषदेत रवी शास्त्री ( Ravi Shastri ) म्हणाले की, “माझा विश्रांती घेण्यावर कधीच विश्वास नाही. कारण मला जर संघ समजून घ्यायचा आहे, मला खेळाडूंना समजून घ्यायचे आहे, जेणेकरून संघावर नियंत्रण राहील. त्यामुळे मला वाटत नाही की एवढ्या विश्रांतीची गरज आहे. तसेही आयपीएल दरम्यान तुम्हाला २-३ महिन्यांचा काळ विश्रांतीसाठी मिळतच असतो. दुसरी गोष्ट मला वाटते की प्रशिक्षक हा व्यावहारिक असावा.”
शास्त्री ( Ravi Shastri ) पुढे म्हणाले की, “मी कोणालाही लक्ष्य करू इच्छित नाही, परंतु भविष्यात भारतीय संघाने खेळाडूंसाठीची भूमिका ओळखून कोणता खेळाडू बेस्ट आहे हे पहिले पाहिजे. त्याचबरोबर इंग्लंडच्या रणनीतीचेअनुकरण करणे आवश्यक आहे. मी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी सहमत आहे की वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव संघासाठी आवश्यक आहे, परंतु युवा खेळाडूही संघासाठी चांगली कामगिरी करू शकतात.”
रवी शास्त्री ( Ravi Shastri ) म्हणाले की, “इंग्लंड संघाने विश्वचषकासाठी काही वरिष्ठ खेळाडूंना वगळले होते, परंतु त्यांना निर्भयपणे खेळणारे युवा खेळाडू मिळाले. त्यांनी स्पर्धेत खेळात फारसा बदल न करता त्याच्या स्वभावानुसार खेळले. भारतातही कित्येक खेळाडूंकडे प्रतिभा आहे. मला वाटते की या न्यूझीलंडच्या दौऱ्यापासून नवीन संघ बांधणीला सुरुवात होऊ शकते. कारण या दौऱ्यावर संघात बरेच युवा खेळाडू आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर पुढील T20 विश्वचषकापूर्वी तुम्ही त्या खेळाडूंची प्रतिभा पारखून बघू शकता.