संघाच्या कर्णधाराकडून चांगली कामगिरी न झाल्यास त्याच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असतात. त्याप्रमाणे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही ( Babar Azam ) आता त्यांच्यात देशाच्या माजी खेळाडूंनी कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा संघ कसा बसा फायनलमध्ये पोहोचला, मात्र बाबर आझमकडून संघासाठी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्या संथ गतीच्या फलंदाजीचा फटका संघाला बसला आहे.
“हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले तर…”,रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य!
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बाबर आझमला ( Babar Azam ) पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा साला दिला आहे. टी-२० विश्वचषकातील संघाची कामगिरी पाहता आता सांगावे नेतृत्व नवीन हातात द्यायला हवे, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे. आफ्रिदीने म्हटले की,”बाबरने टी-२० संघाच्या कर्णधार पदाबाबत स्वतः निर्णय घ्यावा. त्याचबरोबर त्याने टी-२० क्रिकेटमध्ये फक्त आपल्या फलंदाजीकडे लक्ष्य द्यावे. आगामी काळात पाकिस्तानसाठी त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचे नेतृत्व करावे”, अशा शब्दांत आफ्रिदीने बाबरला कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला आहे.
बाबरने ( Babar Azam ) एकदिवासीय आणि कसोटी क्रिकेटच्या नेतृत्वाकडे लक्ष्य द्यावे
यावेळी बोलताना शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची काही खेळाडूंची नवे सुचवली आहेत. आफ्रिदी म्हणाला की, “बाबर ( Babar Azam ) सारख्या खेळाडूसाठी माझ्या मनात मोठ्या प्रमाणात आदर आहे. त्याच्यासारखे खेळाडू मला आवडतात. मात्र त्याच्यावर क्रिकेटचा जास्त भार येऊ नये म्हणून त्याने आता एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचे नेतृत्व कायम करावे. माझ्या मते पाकिस्तानकडे टी-२० मध्ये नेतृत्व करतील असे काही खेळाडू आहेत. यामध्ये शादाब खान, मोहम्मद रिझवान आणि शान मसूद असे खेळाडू ही जबाबदारी सांभाळू शकतात.”
Shahid Afridi : Babar Azam should quit t20i captaincy and focus on his batting. We have other players who can lead T20i team like Shadab, Rizwan and even Shan. pic.twitter.com/hkZxI3duic
— Thakur (@hassam_sajjad) November 16, 2022
पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकाच्या फायनल सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला. त्यामुळे सर्वांच्या निशाण्यावर बाबर आझम ( Babar Azam ) आला. कारण त्याने या संपूर्ण स्पर्धेत चांगली केली नाही आणि फायनलमध्येही त्याला अपयश आले. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांसह माजी क्रिकेटपटुंनी त्यालाच धारेवर धरले.