सामलखा (हरियाणा) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच विविध ठिकाणच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे. त्या टिकेवर संघानेही आता प्रतिक्रीया दिली आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींनी अधिक जबाबदारीने बोलून समाजात संघाच्या स्वीकारार्हतेचे वास्तव पाहिले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध गांधींच्या अलीकडील टीकेबद्दल विचारले असता, होसाबळे म्हणाले की, ते त्यांच्या “राजकीय अजेंडासाठी” हे करत असावेत परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकीय क्षेत्रात काम करत नाही आणि त्यांची संघाशी स्पर्धा नाही. तथापि त्यांनी एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे आणि संघाचा विस्तार आणि समाजातील स्वीकारार्हता याचे वास्तवही त्यांनी स्वीकारले पाहिजे. येथे तीन दिवस संघाच्या प्रतिनीधी सभेची बैठक पार पडली.
या बैठकीच्या समारोपप्रसंगी होसबाळे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. लंडनमधील राहुल गांधींच्या वक्तव्यावरच्या प्रश्नांना उत्तर देताना होसबाळे म्हणाले की, ज्यांनी भारताचे तुरुंगात रूपांतर केले त्यांना देशातील लोकशाहीवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. संघाच्या मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या प्रकाराविषयी विचारले असता होसाबळे म्हणाले की, आरएसएसचे नेते केवळ मुस्लिमांच्या निमंत्रणावरून त्यांचे विचारवंत आणि त्यांच्या आध्यात्मिक नेत्यांना भेटत आहेत.