पुणे – रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा पाय अधिक खोलात गेला तर दुसऱ्या बाजूला विदर्भ संघाने आपली स्थिती अधिक बळकट करुन दुसऱ्या दिवस अखेर २३१ धावांची आघाडी घेतली आहे. गहुंजे येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन्ही दिवसांवर विदर्भने वर्चस्व राखले आहे. महाराष्ट्राला कालच्या पहिल्या दिवशी २०८ धावांवर गुंडाळल्यावर शनिवारी अखेर विदर्भाने ६ बाद ४३९ धावांपर्यंत मजल मारली.
Stumps Day 2: Vidarbha – 439/6 in 105.6 overs (Harsh Dubey 13 off 23, Karun Nair 128 off 205) #MAHvVID #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 10, 2024
मुळचा कर्नाटकचा असलेला माजी कसोटीवीर करुण नायरने नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे मुळचा दिल्लीचा असलेल्या ध्रुव शौरे याचे ९१ तर अक्षय वाडकरने ९० धावांची खेळी केली. शुक्रवारच्या १ बाद १११ धावांवरुन आज खेळ पुढे झाल्यावर महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसभरात केवळ पाचच फलंदाज बाद करता आले तर विदर्भाच्या फलंदाजांनी ३२८ धावा फटकावल्या. काल ५५ धावांवर नाबाद असलेल्या शौरेचे शतक आठ धावांनी हुकले मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या करुण नायरने नाबाद १२८ धावांची खेळी केली.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज अक्षय वाडकरचेही शतक दहा धावांनी हुकले, परंतु त्याने ९० धावांसाठी १०१ चेंडू घतले आणि १२ चौकार मारले. महाराष्ट्राला बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर या सामन्यासह पुढच्या लढतींतही बोनस गुणांसह निर्णायक विजयाची आवश्यकता आहे.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्रः पहिला डाव ः २०८; विदर्भ, पहिला डाव ः ६ बाद ४३९ (ध्रुव शौरे ९२, करुण नायर खेळत आहे १२८, यश राठोड ४२, अक्षय वाडकर ९०; प्रदीप दाधे ९७-२, अक्षय पालकर १००-२
#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…
मुंबई संघाची घसरगुंडी!
पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांच्या शानदार शतकामुळे मुंबईने १ बाद २८९ अशी भक्कम सुरुवात केली होती, पण आज पूर्ण संघ ३५१ धावांत गारद झाला. ६१ धावांत ९ फलंदाज गमावले. आज तर ६ फलंदाज ४१ धावांत बाद झाले. त्यानंतर छत्तीसगढने दिवसअखेर ४ बाद १८० अशी सुरुवात केली. पहिल्या डावात आघाडीसाठी त्यांना अजून १७१ धावांची गरज आहे.
मुंबई पहिला डाव : ३५१ (पृथ्वी शॉ १५९, भूपेन लालवानी १०२, सूर्यांश शेडगे २९, रवी किरण ५३-३, आशीष चौहान १०५-६) छत्तीसगढ, पहिला डाव ः ४ बाद १८० (शशांक चांदरकर ५६, संजीत देसाई ४१, अमनदीप खेळ खेळत आहे ३५, तुषार देशपांडे ६८-१, रॉस्टन डायस १९-१, तनुष कोटियन १९-१).